Sunday, 4 September 2011

तो

तो
ती चारचौघीन्सारखी कधीच नव्हती...प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याचा तिचा स्वभाव ...आणि प्रत्येक गोष्टीत झोकून द्यायची तिची सवय तिला सगळ्यांपासून वेगळ करत होती..
पहिला पाउस, पाहिलं फुल , मातीचा ओला वास, झाडाचा पहिला बहर ...प्रत्येक गोष्ट तिला वेड लावणारी...नवीन संकट झेलून परत नव्याने उभं करणारी सामोर जाण्यासाठी ताकद देणारी...एकटीने झगडताना साथ देणारी....
अशाच एका संद्याकाळी तो भेटला तिला...ती हरखून गेली...तिच्यासारखाच तो , प्रत्येक गोष्टीत समरस होणारा...तिच्या सारखा वेडा होणारा तो...तिला नवनवीन अनुभव सांगणारा तो, तिच्या मनाचा कब्जा कधी घेऊन बसला कळलच नाही तिला...पहिल्यांदाच कुणीतरी वेड म्हणत नव्हत तिला, पहिल्यांदाच कुणीतरी समजून घेत होत तिला. अनुभव share केल्यावर होणारा आनंद पहिल्यांदाच कळत होता तिला...ती खूप खुश होती त्याच्याबरोबर...ती बऱ्याच वर्षात खळखळून हसायला लागली होती...आनंद व्यक्त करायला लागली होती..
आतापर्यंत तिच्या आयुष्यात फक्त झगडण होत पण आता त्याचा तिला त्रास होत नव्हता..आता दिवसातला प्रत्येक क्षण त्याने व्यापला होता...त्याला किती सांगू अन किती नको असा होऊन जात होत तिला...तो पण प्रत्येक गोष्ट मनलावून ऐकत होता तिची, गरज असेल तर सल्ला देऊन मदतही करत होता ......
तिला हळूहळू जाणीव व्हायला लागली...लोकांच्या बदलेल्या नजरा आणि आजूबाजूला होणऱ्या कुजाबुजीने ती अस्वस्थ व्हायला लागली......... तिला कळेनास झाल, काय चालल आहे आपल्या आजूबाजूला?....तीन तो विषय त्याच्याकडे काढला...त्याला गंमत वाटली..अरे किती विचार करते हि?!! खरच गरज आहे ? पण त्याला तिची अवस्था समजायला वेळ नाही लागला...त्यान थोड दुर्लक्ष करायला सांगितलं तिला..पण तिची तगमग वाढतच होती..
आणि एक दिवस घरातच स्फोट झाला त्याचा...घरातल्या सगळ्यांनी धारेवर धरल तिला.."कोण तो ? आणि इतक काय बोलत असतेस त्याच्याबरोबर? खिदळत काय असतेस? जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा थोडी.." अरे,बापरे किती आणि काय?? खरच इतक वाईट आहे का हे?? त्याच्यात आणि तिच्यात चांगल १० वर्षाच अंतर होतं...तो खूपच लहान होता पण विचारांनी तिच्या जास्त जवळ होता..तिला समजून घेत होता..वयाच्या चाळीशीत, मुला नसताना होणारी ओढाताण समजून घेऊन हळूवारपणे फुंकर घालत होता..तिच्या आवडीनिवडी जपत होता
खरचं इतक्या वर्षांनी कुणीतरी आपली काळजी करतय याच पण अप्रूप होत तिला..पण तिला प्रश्न विचारणार्यांनी यापेकी कशाचाही विचार नाही केला... ती विचार करत राहिली खरच, कोण आहे तो ?? मित्र ? का प्रियकर? का भाऊ? कोण आहे तो?? कसलं नात आहे आपल त्याच्याशी? तिला असा कुठलाही नात नको होत जे अपेक्षा घेऊन येत होत कारण अशा अपेक्षा चिकटून मेलेली बरीच नाती पहिली होती तीच सगळ्यात जवळच नात पण त्यामुळेच तर मेल होत..त्या विचारांनी ती मन कडू झाल , पण क्षणभरच, आणि तिला एकदम जाणवलं तो "सखा" आहे, हो सखाच. अगदी कृष्ण जसा गोपिकांचा होता तसा..राधेचा होता तसा , तिचा सखा..तीच नात ठरलं त्याचाय्शी असा नात ज्याच्यात अपेक्षा नाहीत, कसली देवाण घेवाण नाही...द्यायची तर फक्त मैत्री आणि  घ्यायाची तर फक्त मैत्री..ती पण अपेक्षा नाही...
तिला खूप बर वाटल..आता कुणी काही म्हणोत ती मोकळी झाली सगळ्यातून..गेल्या काही दिवसांची तगमग शांत झाल्यासारखी वाटली तिला..तीन तिच्या सख्याला सांगितलं..तो एक क्षण गप्प झाला आणि तीला म्हणाला ," तू जे ठरवशील ते ." त्याच्या आश्वासक स्वरांनी तिला बर वाटल..
पण तीच हे असा नात कुणालाच पसंत नव्हत. तिच्या नावर् यानेच तिला विचारलं," या वयात कसली थेर?? असा कुठल नात असत??" ती शांत बसली. कारण आता तिला गरज वाटत नव्हती त्याला उत्तर द्यायची. आणि तस पण त्यान कुठ तिला गृहीत धरल होत दुसर लग्न करताना? तिला माहिती आहे कि आज नाहीतर उद्या हे सगळ स्वीकारलं जाईल कारण दुसरा काहीही पर्याय असणार नाही..
आणि आता इतकी वर्ष एकटीन काढल्यावर तिला तिच्या सख्याला गमवायच नाहीये...... ती वाट बघतेय शांतपणे..

1 comment:

  1. मनोव्यापार...समजून घेण कठीण ..आणी तो शब्दात मांडणे त्याहहून कठीण ..पण तुमच्या लेखनाची उंची खुपच छान आहे...

    ReplyDelete