Thursday, 15 September 2011

खूप  खुश  होती  आज  ती …एकदम  आनंदात  होती …सगळ्या  जगाला  ओरडून  सांगायची  इच्छा  झाली  होती  तिची . ती  आई  बनणार  होती ..तीच  पूर्ण  शरीर  आनंदान  भरून  गेला  होत . तिच्या  चेहऱ्यावरून  आनंद  अगदी  ओसंडून  वाहत  होता . तिचा  नवरा  पण  खूप  खुश  झाला  होता . लग्नाला  दोन  वर्ष  झाली  होती  आणि  अतिशय  आतुरतेने  ते  ह्या  बातमीची वाट पाहत होते. दोघींनी  office ला सुट्टी  टाकली  आणि  आपल्या  आवडीच्या  ठिकाणी  जाऊन  बसले - वरळीला …समुद्र  बघत .. आपल  गुपित  दोघांनी  समुद्राशी  share केल ..आभाळाशी  share केल ..गेल्या  वर्षभरापासून  दोघ  एकटेच  होते …दोघींचे  पण  आई - वडील  वैष्णोदेवीच  दर्शन  घेऊन  परत येत असताना accident मध्ये  गेले  होते …त्या  दुखः  तुना  बाहेर  पडता  पडता  हि  news कळल्यामुळे  त्यांना खूप  आनंद  झाला  होता.
तो  खूप  काळजी  घेत  होता  तिची …तिन राजीनामा  द्यायचा  ठरवलं . तिला  कोणतीही  दगदग  करायची  नाही  असा  डॉक्टरांनी सांगितलं  होत . त्याची  पण  संमती  होती . ती  आता  घरीच  असायला  लागली . आपण आपल्यासारखा  एक  जीव  जन्माला  घालणार  या  विचाराने  हरखून  गेली  होती  ती . ती  सतत  बाळाचाच  विचार  करत  होती , कस  असेल  ते ? कोण  असेल , मुलगा  का  मुलगी ? आपण  खूप  छान  सांभाळू  त्याला . त्याला  मोठ  करताना  त्याच्या  वयाचे  होऊन  समजून  घेवू  त्याला . दिवस  कसे  जात  होते  तिला  काळतच नव्हत .
त्याला  थोडी  काळजी  वाटत  होती . रोज  office मधून  घरी  आल्यावर  ती  दिवसभर  बाळाबद्दल  काय  विचार  केला  ते  सांगत  असायची. ती  खूप  जास्त  गुंतत  चालली  होती ..त्याला  ते  लक्षात  येत  होत  पण  तो  काहीच  करू  शकत  नव्हता  . दोघांचे  आई -वडील  गेल्यावर  कोसळेली  ती  पहिली  होती  त्याने , त्यापेक्षा  आताची  ती  सावरली होती , नुसती  सावरलेली  नाही  तर  आनंदात   असलेली  बघून  बर  पण  वाटत  होत  त्याला . खूप  प्रेम  करत  होता  तो तिच्यावर  आणि  म्हणूनच  जन्माला  न  आलेल्या  बाळाबद्दल  थोडीशी  असूया  पण  वाटत  होत i त्याला .
पण  खरच  कितीवेळा  आपण  जे  ठरवतो  ते  घडत ?? तिच्याबाबतीत  पण  हेच  घडल ….साध  निमित्त  मंदिराच्या  पायऱ्या  चढताना  पाय  सकातला …आणि  ती  धाडधाड  15-20 पायऱ्या  खाली  आली …पायरीवरून  तोल  जाऊन  सरळ  पोटावार आपटली आणि  बेशुद्ध  झाली ..
याचा परिणाम व्हायचा तोच झाला. तिला घेऊन तो घरी आला आणि रिकाम घर बघून तिला गलबलून आल. खरतर घर रिकामाच होत आधीपण फक्त आधी तीच बाळ होत तिच्याबरोबर .
तिला घर आता खायला उठत होत. काय कराव ते समजत नव्हत. ती वेड्यासारखी झाली होती. तीच घराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं.तीच त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागल. तो कधी येतो कधी जातो काही कळत नव्हत तिला. त्याला त्रास व्हायला लागला आता...त्याच वजन झपाट्यानं कमी झाल..तिला यातून कसा बाहेर काढाव हेच कळत नव्हता त्याला. जसजसे दिवास जात होते तसतशी तीच वागण जास्तच विचित्र व्हायला लागल. डॉक्टरांनी त्याला तिला कुठतरी लांब घेऊन जायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यान एक मस्त trip arrange केली नैनितालला. जायची तयारी अर्थातच त्यालाच करायची होती. तिला घेऊन तो बाहेर गेला shopping साठी .
ज्या दुकानात ते गेले तिथे अचानक तिला तिची मैत्रीण दिसली.अर्थात तिनेच हाक मारली. काय ?, कसा? वगैरे गप्पा झाल्यावार तिने विचारलं,"काय ग? सगळ ठीक आहे ना? अशी काय वाटते आहेस हरवल्यासारखी?". "काही नाही , काही नाही म्हणत ती दुकानात शिरली. त्यान मात्र तिला phone करायला सांगितला आणि मदत हवी आहे असा पण सांगितलं. तस पण तिन नोकरी सोडल्यापासून कुणाचा संबंध राहिला नव्हता.
तिला phone वर सगळ सांगितल्यावर तिच्या मैत्रिणीला पण वाईट वाटल. तिन त्यादोघांना office ला यायला सांगितलं. office च नाव ऐकून त्यान थोडा विचार केला पण तो तयार झाला.
ती एका वेश्यावस्तीत त्यांच्या मुलांसाठी शाळा चालवत होती. त्या दोघांना तिथे आलेल बघून तिला बर वाटल. त्या मुलांबरोबर एक दोन आय पण होत्या.......
त्या मुलांची मस्ती बघत राहिली ती...हळूहळू हसायला लागली. त्यांच्याशी बोलायली लागली...ती मुल पण लगेच चिकटली तिला. "उद्या येते", म्हणून निरोप घेतला तिन. परत येताना तिला खूप बर वाटत होत. काहीतरी भरल्यासारख वाटत होत. तिच्याकड बघून त्याला पण बर वाटल. तिन त्याला तिथे जाऊ का म्हणून विचारलं? तिच्या सध्याच्या अवस्थेत नाही म्हणण जीवावर आल त्याच्या.
ती रोज जायला लागली. हळूहळू तिथे mix व्हायला लागली. तिथे येणाऱ्या बायकांच्या कहाण्या एकून तिला वाईट वाटत होत पण मनातून आपली स्थिती कितीतरी चांगली आहे हे बघून बर पण वाटत होत...ती तिच्या frustration मधुन बाहेर यायला लागली. डॉक्टरांनी त्याला सांगितलं, आपल्यपेक्षा जास्त दुखी लोक बघून तिला आपल दुख कमी झाल्याची जाणीव झाली आहे, शेवटी दुख आणि सुख मानाण्यावार आहे. काही लोकांसाठी छोट्या छोट्या गोष्टीपण खूप दुख्दायक ठरतात आणि काही लोक खूप मोठ्या गोष्टी पण सहज स्वीकारतात. शेवटी आपल मन जे आणि जसं मानत तेच खर.

Sunday, 4 September 2011

तो

तो
ती चारचौघीन्सारखी कधीच नव्हती...प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याचा तिचा स्वभाव ...आणि प्रत्येक गोष्टीत झोकून द्यायची तिची सवय तिला सगळ्यांपासून वेगळ करत होती..
पहिला पाउस, पाहिलं फुल , मातीचा ओला वास, झाडाचा पहिला बहर ...प्रत्येक गोष्ट तिला वेड लावणारी...नवीन संकट झेलून परत नव्याने उभं करणारी सामोर जाण्यासाठी ताकद देणारी...एकटीने झगडताना साथ देणारी....
अशाच एका संद्याकाळी तो भेटला तिला...ती हरखून गेली...तिच्यासारखाच तो , प्रत्येक गोष्टीत समरस होणारा...तिच्या सारखा वेडा होणारा तो...तिला नवनवीन अनुभव सांगणारा तो, तिच्या मनाचा कब्जा कधी घेऊन बसला कळलच नाही तिला...पहिल्यांदाच कुणीतरी वेड म्हणत नव्हत तिला, पहिल्यांदाच कुणीतरी समजून घेत होत तिला. अनुभव share केल्यावर होणारा आनंद पहिल्यांदाच कळत होता तिला...ती खूप खुश होती त्याच्याबरोबर...ती बऱ्याच वर्षात खळखळून हसायला लागली होती...आनंद व्यक्त करायला लागली होती..
आतापर्यंत तिच्या आयुष्यात फक्त झगडण होत पण आता त्याचा तिला त्रास होत नव्हता..आता दिवसातला प्रत्येक क्षण त्याने व्यापला होता...त्याला किती सांगू अन किती नको असा होऊन जात होत तिला...तो पण प्रत्येक गोष्ट मनलावून ऐकत होता तिची, गरज असेल तर सल्ला देऊन मदतही करत होता ......
तिला हळूहळू जाणीव व्हायला लागली...लोकांच्या बदलेल्या नजरा आणि आजूबाजूला होणऱ्या कुजाबुजीने ती अस्वस्थ व्हायला लागली......... तिला कळेनास झाल, काय चालल आहे आपल्या आजूबाजूला?....तीन तो विषय त्याच्याकडे काढला...त्याला गंमत वाटली..अरे किती विचार करते हि?!! खरच गरज आहे ? पण त्याला तिची अवस्था समजायला वेळ नाही लागला...त्यान थोड दुर्लक्ष करायला सांगितलं तिला..पण तिची तगमग वाढतच होती..
आणि एक दिवस घरातच स्फोट झाला त्याचा...घरातल्या सगळ्यांनी धारेवर धरल तिला.."कोण तो ? आणि इतक काय बोलत असतेस त्याच्याबरोबर? खिदळत काय असतेस? जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा थोडी.." अरे,बापरे किती आणि काय?? खरच इतक वाईट आहे का हे?? त्याच्यात आणि तिच्यात चांगल १० वर्षाच अंतर होतं...तो खूपच लहान होता पण विचारांनी तिच्या जास्त जवळ होता..तिला समजून घेत होता..वयाच्या चाळीशीत, मुला नसताना होणारी ओढाताण समजून घेऊन हळूवारपणे फुंकर घालत होता..तिच्या आवडीनिवडी जपत होता
खरचं इतक्या वर्षांनी कुणीतरी आपली काळजी करतय याच पण अप्रूप होत तिला..पण तिला प्रश्न विचारणार्यांनी यापेकी कशाचाही विचार नाही केला... ती विचार करत राहिली खरच, कोण आहे तो ?? मित्र ? का प्रियकर? का भाऊ? कोण आहे तो?? कसलं नात आहे आपल त्याच्याशी? तिला असा कुठलाही नात नको होत जे अपेक्षा घेऊन येत होत कारण अशा अपेक्षा चिकटून मेलेली बरीच नाती पहिली होती तीच सगळ्यात जवळच नात पण त्यामुळेच तर मेल होत..त्या विचारांनी ती मन कडू झाल , पण क्षणभरच, आणि तिला एकदम जाणवलं तो "सखा" आहे, हो सखाच. अगदी कृष्ण जसा गोपिकांचा होता तसा..राधेचा होता तसा , तिचा सखा..तीच नात ठरलं त्याचाय्शी असा नात ज्याच्यात अपेक्षा नाहीत, कसली देवाण घेवाण नाही...द्यायची तर फक्त मैत्री आणि  घ्यायाची तर फक्त मैत्री..ती पण अपेक्षा नाही...
तिला खूप बर वाटल..आता कुणी काही म्हणोत ती मोकळी झाली सगळ्यातून..गेल्या काही दिवसांची तगमग शांत झाल्यासारखी वाटली तिला..तीन तिच्या सख्याला सांगितलं..तो एक क्षण गप्प झाला आणि तीला म्हणाला ," तू जे ठरवशील ते ." त्याच्या आश्वासक स्वरांनी तिला बर वाटल..
पण तीच हे असा नात कुणालाच पसंत नव्हत. तिच्या नावर् यानेच तिला विचारलं," या वयात कसली थेर?? असा कुठल नात असत??" ती शांत बसली. कारण आता तिला गरज वाटत नव्हती त्याला उत्तर द्यायची. आणि तस पण त्यान कुठ तिला गृहीत धरल होत दुसर लग्न करताना? तिला माहिती आहे कि आज नाहीतर उद्या हे सगळ स्वीकारलं जाईल कारण दुसरा काहीही पर्याय असणार नाही..
आणि आता इतकी वर्ष एकटीन काढल्यावर तिला तिच्या सख्याला गमवायच नाहीये...... ती वाट बघतेय शांतपणे..